सुविचार - २६ ते २८
मराठी सुविचार पुढील भाग -
- २६) निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही.
- २७) खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.
- २८) उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा.
- २९) चुकीचा व्यवहार माणसं तोडतो म्हणून तो सत्याने आणि सन्मानाने करा.
- ३०) नवं काहीतरी शिकण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी.
- ३१) माणसाची चौथी मूलभूत गरज म्हण्जे पुस्तक.
- ३२) सत्याने मिळतं तेच टिकतं.
- ३३) जो दुसऱ्यांना देतो त्याला देव देतो.
- ३४) परमेश्वराच्या आशीर्वादाशिवाय कुठलेही कार्य सिध्दीस जात नाही.
- ३५) हिंसा हे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे; मग ती एखाद्या माणसाची असो वा पशुची !
- ३६) स्वप्न आणि सत्य यात साक्षात परमेश्वर उभा असतो.
- ३७) प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो.
- ३८) खरी श्रीमंती शरीराची, बुध्दीची आणि मनाची
- ३९) तडजोड हे आयुष्याचं दुसरं नाव आहे.
- ४०) वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं ! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस !!
- ४१) जो गुरुला वंदन करत नाही; त्याला आभाळाची उंची लाभत नाही.
- ४२) गर्वाचं घर नेहमीच खाली असतं.
- ४३) झाडावर प्रेम करणारा माणूस सदैव प्रसन्नच असतो.
- ४४) माणसाचा सगळ्यात मोठा सदगुण म्हणजे त्याची माणुसकी
- ४५) क्रांती हळूहळू घडते; एका क्षणात नाही.
- ४६) सहल म्हणजे माणसिक आनंदाची सामुहिक क्रिडा
- ४७) मुक्या प्राण्यांवर सदैव प्रेम करा.
- ४८) आयुष्याच्या प्रवासात प्रवास अत्यावश्यक आहे.
- ४९) बाह्यसौंदर्यापेक्षा अंतर्गत सौंदर्य जास्त मोलाचं असतं.
- ५०) मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते।
क्रमश:
नवीन कविता छान आहेत...आणि सुविचारही..माझ्या ब्लॉगवर "हलकी फुलकी करमणुक" हा नवीन धागा सुरू केला आहे. एकदा भेट देऊन जरुर कळवा!
ReplyDelete