
चारोळ्यांच किती चांगलं असतं
प्रत्येकाच्या मनासारखं वागतात
मनातल्या प्रत्येक भावना
मोजक्या शब्दात सांगून टाकतात!
-----------------------------
चारोळ्यांच्या जगात वावरताना
मला काहिच आठवत नाही
सर्व आठवणी शब्दात मांडतो
कारण मनात मी काहिच साठवत नाही
-----------------------------
चारोळ्या आपल्या जीवनात
फार महत्वाची भूमिका बजावतात
एकूण एक शब्दतून आपल्याला
जुन्या आठवणीत पाठवतात
-----------------------------
चारोळ्यांच्या जगात वावरायला
प्रत्येकाला आवडत असतं
दुःखाच्या क्षणी आपल्याला ते
सुखाच्या गावात पाठवत असतं
-----------------------------
समुद्रकिनारी तिच्यासोबत
मी वाळूचं घर बांधलं होतं
नजर चुकवून पाण्याच्या लाटेसोबत
ते घर कधीच वाहून गेलं होतं
-----------------------------
तुझ्या घराची खिडकी
मला पाहून नेहमी हसते
तिच्या हसण्यात सुद्धा मला
तुझ्या गालावरचीच खळी दिसते
-----------------------------
तुझ्या घराच्या वाटेवरील
प्रत्येक गोष्टीसोबत माझी मैत्री झाली आहे
कारण तु सोबत नसताना
त्यानींच मला खरी साथ दिली आहे
-----------------------------
तुझ्या घराच्या खिडकिकडे पाहतो
तेव्हा पडदा असतो लावलेला
माझ्या तेव्हाच्या वेदना पाहण्यासाठी
गावही तिथे असतो जमलेला
-----------------------------
-: कवी रवी विश्वासराव
(प्रेमांकुर - चारोळी संग्रह)
No comments:
Post a Comment