!! आजचे सुभाषित !!

!! आजचे सुभाषित !!
फ़क्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास !

Saturday, August 21, 2010

आदरणीय कै. नारायण सुर्वे सरांना भावपूर्ण आदरांजली.



मराठी कविता गोडगुलाबी आणि गौडबंगाली बाजात अडकली असताना रोजच्या जगण्यातील जीतेजागते संघर्षमय वास्तव साध्या आणि थेट शब्दांत मांडणारे ज्येष्ठ कवी नारायण सुर्वे यांचे प्रदीर्घ आजाराने सोमवारी येथील ' ठाणे हेल्थ केअर ' मध्ये निधन झाले . ते ८४ वर्षांचे होते . कामगार , कष्टकरी , वंचित या वर्गांच्या व्यथा - वेदनांना धारदार शब्दरूप देणाऱ्या आणि त्याद्वारे निरर्थक शब्दांच्या वेढ्यातून कविता मुक्त करणाऱ्या या थोर कवीच्या जाण्याने कवितेचे ' ब्रह्म ' लोपल्याची शोकसंवेदना व्यक्त होत आहे . सोमवारी संध्याकाळी दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत असंख्य चाहत्यांच्या उपस्थितीत , सरकारी इतमामात सुर्वे यांना अखेरचा निरोप देण्यात आला .

गिरणगावातल्या कामगाराच्या वेदनेला शब्दांची धार देणारे ज्येष्ठ कवी नारायण गंगाराम सुर्वे यांचे आज ठाणे येथील हेल्थ केअर हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. गेले काही दिवस ते श्वसनविकार आणि दम्याच्या त्रासाने आजारी होते.

सोमवारी दुपारी त्यांचे पार्थिव प्रभादेवीतील लोकवाङ्मय गृह येथे अंत्यदर्शनसाठी ठेवण्यात आले. त्यानंतर संध्याकाळी दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार कण्यात आले.

लालबाग-परळमधील गिरणीकामगाराची वेदना सोबत घेऊन जन्मलेल्या सुर्वे यांनी आयुष्याची विविध रंग अनुभवले. रस्त्यावरल्या जगण्याचे चटके सोसताना त्यांनी कामगार चळवळीची दाहकताही अनुभवली. गिरणगावातील डाव्या चळवळीत त्यांनी समाजकारणाचे धडे घेतले. आपले ते रस्त्यावरचे आयुष्य हे ' माझे विद्यापीठ ' च आहे असे त्यांनी मानले आणि ते शब्दातही मांडले।

कामगार आहे मी तळपती तलवार आहे
सारस्वतांनो! थोडासा गुन्हा करणार आहे

नारायण सुर्वे यांचा पहिला काव्यसंग्रह ' ऐसा गा मी ब्रह्म! ' १९६२ मध्ये प्रकाशित झालं. त्या सुमारास ते मौज , सत्यकथा , मराठा , मांडवी , वीणा , युगांतर , भारूढ अशा काही नियतकालिकांतून कविता लिहित होते. त्यानंतरच्या चार वर्षांनी त्यांचा दुसरा काव्यसंग्रह आला. ' माझें विद्यापीठ '

कामगार जीवनाशी असलेल्या थेट संबंध असल्यामुळे कवी मनाचे नारायण सुर्वे यांनी त्यांनी शाळेत शिक्षक म्हणून शिकवत असतानाच कामगार चळवळीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. १९७० च्या दशकात भारत , तत्कालीन सोवियत रशिया आणि पूर्वेकडील देशांमध्ये सक्रीय कामगार नेते म्हणून त्यांची नवी ओळख निर्माण झाली. मुंबईतील कामगार संघटनेत काम करताना त्यांनी कामगारांच्या हक्कांसाठी तीव्र संघर्ष केला. पण या काळातही कवितेशी असणारी मैत्री काही तोडली नाही.

कवितेतून भीषण वास्तव मांडणा-या नारायण सुर्वे यांना १९९८मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांना सुवर्ण कमळ आणि १९९९च्या कबीर पुरस्काराने गौरविण्यात आले. परभणी येथे १९९५ मध्ये संपन्न झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. साहित्य अकादमीवर मराठी साहित्य या विषयासाठी नेमलेल्या सल्लागार समितीवर समन्वयक म्हणून त्यांनी काम पाहिले होते.


तमाम महाराष्ट्र वासियांकडून आदरणीय कै. नारायण सुर्वे सरांना भावपूर्ण आदरांजली.

सौजन्य

No comments:

Post a Comment