Pages

Wednesday, March 31, 2010

प्रेमस्पर्श 4

विवाह रुपाने बांधली जाईल
तुझी नि माझी जीवनगाठ

कारण आहे आपल्या दोघांची

एकच पाऊलवाट

———————————

काहीजण किती

कठोर नियम पाळतात

प्रेम करणाऱ्यांना नेहमी

बदनामीच्या आगीत जाळतात

———————————

काहीजण कळूनसुद्धा

नकळल्यासारखे वागतात

प्रेम करणाऱ्यांवरती ते

सदैव बंधने लादतात

———————————

प्रेम करण्यासाठी हवी तयारी

संकटांना तोंड देण्याची

प्रेमाने मागून मिळत नसेल तर

जबरदस्तीने ओढून घेण्याची

———————————-

लोकांच अजब आहे

प्रेमाला ते नाव ठेवतात

लग्न जुळवताना मग ते

गाव का शोधतात?

———————————

-: रवि विश्वासराव (कवी)
(प्रेमस्पर्श-चारोळी संग्रह)

No comments:

Post a Comment